scorecardresearch

Premium

शेतकरी संवाद यात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शुभारंभ; ठाण्यातील टेम्भी नाका येथून प्रारंभ

या यात्रेचा माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत.

eknath shinde flag off shetkari samvad yatra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला.

ठाणे :- शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ टेम्भी नाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला.

या यात्रेचा माध्यमातून शिवसेना शेतकरी सेनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. त्यातील काही प्रश्नांचे जागच्या जागी निराकरण करण्यात येईल.  तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्री स्वतः ऑनलाइन त्या शेतकऱ्याशी थेट संवाद साधून त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Rauts statement, Devendra Fadnavis criticized Sanjay Raut
“संजय राऊत यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर, हे त्यांनाच ठाऊक” देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील यांनी नव्या लोकांना जुन्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवले; कोल्हापुरातील भाजपाच्या निष्ठावंतांचा आरोप
Jagan Mohan Reddy and Chandrabbau Naidu
चंद्राबाबू यांच्या अटकेनंतर तेलगू देसम पक्षाच्या सर्व २१ आमदारांना गृहकैद, राज्यभर पोलिस तैनात
pimpri chinchwad shivsena, ganeshotsav 2023 pimpri chinchwad, Ganesh murti, eco friendly ganesh idols
‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर पर्यावरण पूरक मातीच्या गणेशमूर्ती; शिवसेनेचा उपक्रम

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेचा पर्यावरणपुरक विसर्जनाचा देखावा; राष्ट्रीय हरीत लवादाने पालिकेचे पिळले कान

आजपासून ही सुरु यात्रा सुरू होणार असून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहे. यावेळी प्रामुख्याने त्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेणे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्याना थेट माहिती देणे, त्याना त्या योजनांचे लाभ मिळवून देणे तसेच तसेच वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून फायद्याची शेती करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद साधून त्याना नाविन्यपूर्ण शेतीबाबत अवगत केले जाणार आहे.

हेही वाचा >>> ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली

या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी आणि शासन यांच्यात थेट संवाद साधणे शक्य होणार असून मुख्यमंत्री स्वतः या यात्रेकडे प्राथमिकता देऊन त्याकडे लक्ष देणार आहेत. एकीकडे राज्यात यंदा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न आतापासूनच आ वासून उभे आहेत. अशात शासनाचे शेतकरी बांधवांकडे लक्ष असून त्यांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा संदेश या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्याचा शिवसेनेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज झालेल्या या शुभारंभ प्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde flag off shetkari samvad yatra zws

First published on: 28-09-2023 at 21:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×