वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत होणारा पाण्याचा पुरवठा यात वाढत जाणारी तफावत यामुळे बदलापूर शहरातील विस्तारीत भागात आता पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंगळवारी विस्तारीत बदलापुरातील गोल्डन व्हॅली या गृहसंकुलातील नागरिकांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हंडी-कळशी मोर्चा काढला. २४ तास नको किमान २४ मिनीटे पाणी द्या अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. लवकरच पाण्याची वेळ वाढवून दिली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा >>>डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मात्र त्या तुलनेत पाणी वितरण व्यवस्था सक्षम नाही. शहरातील उंच, सखल भागात पाण्याची समस्या बारमाही आहे. अनेकदा वीजेचा पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा फटका पाणी वितरण व्यवस्थेला बसतो. त्यात शहराच्या चारही बाजूंना गृहसंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांना पाणी पुरवठा करण्यात जीवन प्राधिकरणाच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. बदलापूर पश्चिमेतील सोनीवली या शहराच्या एका टोकाला असलेल्या गोल्डन व्हॅली या गृहसंकुलातील नागरिकांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. या मोर्च्यात महिलांची संख्या मोठी होती. महिला हंडा – कळशी घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा >>>ठाणे: दुचाकींची एकमेकांना धडक, भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलगा जखमी

आम्हाला बांधकाम व्यावसायिकाने २४ तास पाणी पुरवठ्याची हमी दिली होती. मात्र आजच्या घडीला आम्हाला साधे २४ मिनीटही पाणी मिळत नाही. अनेकदा तर दोन दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. अशावेळी टंँकरसाठी तरी किती पैसे खर्च करणार असा सवाल यावेळी उपस्थित महिलांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर बोलताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता माधुरी पाटील यांनी लवकरच पाणी सोडण्याच्या वेळेत वाढ केली जाईल, असे आश्वासन गोल्डन व्हॅली इमारतीतील रहिवाशांना दिले. त्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.