ठाणे : कोपरी येथे सिद्धेश अभंगे फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात आयोजक आणि संघामध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आयोजक सिद्धेश अभंगे याच्यासह इतर सहा ते सात जणांविरोधात क्रिकेट संघातील खेळाडूंनी तक्रार दाखल केली. सिद्धेश अभंगे याच्या समाजमाध्यमांवरील खात्यावर तो शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेनेचा पदाधिकारी असल्याचे नमूद आहे. आयोजकांमार्फतही संघाच्या काही खेळाडूंविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार कोपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

कोपरी येथील मैदानात २ ते ५ फेब्रुवारी या दरम्यान सिद्धेश अभंगे फाऊंडेशन तर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामान्यावेळी क्रिकेट संघातील काही खेळाडूंचे आयोजकांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाले. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. दरम्यान, घटनेची माहिती कोपरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आयोजक आणि खेळाडूंना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत. सिद्धेश अभंगे याच्या समाजमाध्यमावरील खात्यावर तो शिंदे गटाच्या युवासेनेचा पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे.

Mumbai Police begins investigation into YouTuber Ranveer Allahabadia case
युट्यूबर रणवीर अलाहबादिया प्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
IND vs ENG Ravindra Jadeja surpasses Anil Kumble to become India second highest wicket taker in ODIs against England
IND vs ENG : रवींद्र जडेजाची सलग दुसऱ्या सामन्यात कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Former MLA Suresh Jaithalia on the way to ruling NCP
माजी आमदार सुरेश जेथलिया सत्तेतील राष्ट्रवादीच्या वाटेवर?
controversy fight between players during a cricket match kopri thane viral video
ठाणे : एका चेंडूत दोन धावा, अन् आयोजक सिद्धू अभंंगेसोबत संघाचा राडा, चाकू भिरकावल्याचा दोन्ही गटांकडून दावा, व्हिडीओ वायरल
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
Senior officials unhappy over mismanagement in Maharashtra
निर्ढावलेले प्रशासन, गैरसोयीचे महाराष्ट्र सदन
Story img Loader