ठाणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव  अंतर्गत उद्या सकाळी ११ वाजता  समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम होणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा , महाविद्यालये, विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यात  सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amrut Snan on Vasant Panchami
Mahakumbh Mela 2025 : मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीनंतर वसंत पंचमीसाठी उत्तर प्रदेश सरकारची चोख व्यवस्था; ‘एवढ्या’ कोटी भाविकांचं अमृतस्नान!
Akshata and sudha Murthy in Jaipur Literature Festival
जयपूर साहित्य महोत्सव : संवाद हाच पालक आणि मुलांमधला महत्त्वाचा दुवा – अक्षता मूर्ती
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात! जयपूर महोत्सवात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर
good feelings song Cold Play show ahmedabad Satyajit Padhye puppet show
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
Rashtriya Swayamsevak Sanghs Virat shakha Darshan in Latur on Sunday
रा. स्व. संघाचे लातूरात रविवारी विराट शाखा दर्शन

या अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम उद्या १७ ऑगस्ट रोजी राबविण्याचे  निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात सर्वत्र उद्या सकाळी ११ ते ११.०१ या एका मिनिटाच्या कालावधीमध्ये नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करावे. तसेच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय, निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी,  कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तर यात सहभाग घेणाऱ्या  विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग, सभागृह या ठिकाणी एकत्रित उपस्थित रहावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर राष्ट्रगीत गायनासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका तसेच ग्राम स्तरावर सर्व प्रशासकीय अधिकारी आणि  पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेण्याचा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Story img Loader