ठाणे : मुंब्रा येथील शंकर मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात दिवसातून दोनच तास पाणी पुरवठा केला जात असून त्यातही शनिवारपासून या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याठिकाणी पिण्यायोग्य पाणी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंब्रा येथील शंकर मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात दिवसातून दोनच तास पाणी पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी शनिवारपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब ठाणे काँगेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणली आहे. या दूषित पाण्यामुळे कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता असून यामुळे हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Thane, Water Supply Disruption, Uthalsar and Naupada Areas, thane news, thane water cut, naupada water cut, uthalsar water cut, Thane Water Supply Disruption, water news, thane news, marathi news,
ठाणे : उथळसर, नौपाड्यातील काही भागात सोमवारी पाणी नाही
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

हेही वाचा >>> मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात फुटलेल्या जलवाहिन्या तसेच दुरुस्ती कामांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. याच काळात नळातुन अति दूषित पाणी येणार असल्यास ते पिणे टाळावे, औषधांचा वापर करावा व काही दिवस पाणी उकळून व गाळून पियावे,  असे जाहीर आवाहन नागरिकांना करण्यात यावे. तसेच असा पाणी पुरवठा होऊ नये यासाठी योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची रंग व चव बदलली असल्यास नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे आहे ही बाब मागील आठवड्यातच आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर देखील महापालिकेकडून मुंब्र्यात दुषित पाणीपुरवठा सुरूच असल्याचा आरोप राहुल पिंगळे यांनी केला आहे.