कल्याण : नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडविण्यावर सर्वाधिक भर द्यावा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपुर्वी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिले होते. या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा विभागाने जिल्ह्यात शरद संपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही माहिती बुधवारी कल्याणमध्ये माध्यमांना दिली. ३० सप्टेंबरला मुरबाड तालुक्यातील माळ गटातून तर, १ ऑक्टोबरला वैशाखरे गटातून संपर्क अभियानाला सुरूवात होईल, असे तपासे यांनी सांगितले. वैशाखरे गटातील अभियानाला राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी दीपक वाकचौडे, नामदेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात केली जाणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी कल्याण,
हेही वाचा : कल्याणमध्ये हाॅटेलच्या रोखपालाला बेदम मारहाण; हाॅटेलच्या मालमत्तेचे नुकसान
तसेच या भागातील रस्ते, वीज, पाणी आणि इतर नागरी समस्यांची माहिती घेतली जाणार आहे. हे प्रश्न शासनस्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप नेत्यांना आता सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळच नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर नागरिक नाराज आहेत, असा दावाही तपासे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district ncp decide to start sharad contact campaign from murbad after ncp mla rohit pawar visit css