ठाणे : आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमातून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. हा आनंद आश्रम सामन्यासाठी मंदिर होते. दिघे साहेब शिवसेनेत होते, परंतु आनंद आश्रमात त्यांनी कधीही कोणत्या पक्षाची पाटी लावली नाही. मात्र या स्वार्थी मंडळींनी आज त्याच आनंद आश्रमाचा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजार मांडलाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आज ठाण्यात पक्षाच्या निर्धार मेळाव्यात केली.

अगदी काल परवापर्यंत सर्वसामान्य माणूस आनंद आश्रमात जावून दिघे साहेबांच्या तस्विरीचे पूजन करत असे. आनंद दिघे यांनी आनंद आश्रमातून काम करत असताना तेथे कधीही स्वतःच्या नावाची, पक्षाची पाटी लावली नाही. मात्र त्याच आनंद आश्रमाचा स्वतःच्या स्वार्थासाठी, मिळकत म्हणून या मंडळींनी बाजार मांडला, अशी टीका केदार दिघे यांनी यावेळी बोलताना केली. ठाण्यातील गडकरी नाट्यगृहात आयोजित केलेल्या या मेळाव्यात बोलताना केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर सडकून टीका केली.

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार
maharashtra govt presents interim budget for 2024 25 with revenue deficit of rs 9734 cr
Budget 2024: संकल्पात भक्ती, तुटीची आपत्ती, लेखानुदानात देवस्थाने, स्मारकांसाठी भरीव तरतूद; आर्थिक स्थिती सावरण्याचे आव्हान

हेही वाचा – कल्याणमध्ये वृद्धेच्या हत्येप्रकरणी घर मालकाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – भास्कर जाधव यांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “मुलं गेल्यावर दिघेंनी दुःखातून बाहेर काढलं आणि तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला…”

संपूर्ण जिल्ह्यातील सामान्य माणूस, शिवसैनिकासाठी हा आश्रम पूजनीय होता. मात्र या मंडळींनी स्वतःच्या घाणेरड्या राजकरणासाठी आश्रमावर स्वतःच्या पक्षाचे आणि स्वतःचे नाव लावल्याची टीका दिघे यांनी केली. यांना मानाचा मोठेपणा असता तर केवळ दिघे साहेब यांचे नाव आश्रमावर लावले गेले असते. मात्र मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय की यांची वृत्ती, विचार इतके संकुचित आहेत की यांना स्वतः शिवाय दुसऱ्याचे काही दिसतच नाही, अशा शब्दांत दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.