मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र २०२१ ते २०२३ या दोन वर्षांमध्ये नष्ट झाल्याचे ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०२३’मधून समोर आले आहे. या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनेही नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.

झाडे-झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती, जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असलेले कांदळवनाचे क्षेत्र पर्यावरण आणि सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’मध्ये ठाणे जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या कालावधीत ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाले आहे. मुंबई उपनगरांतील १८ हेक्टर, तर मुंबई शहरातील ३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोकणातील चार जिल्ह्यांचा विचार करता रायगडमध्ये ७०० हेक्टर, पालघर ४०० हेक्टर, रत्नागिरी १०० हेक्टर आणि सिंधुदुर्ग ५२ हेक्टरने कांदळवनाचे क्षेत्र वाढले आहे.

sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
thane municipal corporation plans to replant 2097 trees at headquarters after criticism of cutting 631 trees
पालिका इमारतीमुळे बधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण परिसरातच, ठाणे महापालिका प्रशासनाचा विचार
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा

हेही वाचा >>> राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार

देशातील कांदळवन क्षेत्राची व्याप्ती २०२१च्या तुलनेत २०२३ मध्ये ७०० हेक्टरने (-७.४३ चौ.किमी) कमी झाली आहे. गुजरातने दोन वर्षांत ३,६३९ हेक्टर क्षेत्र गमावले असून इतर राज्यांत त्यात किरकोळ वाढ झाली आहे. महाराष्ट्राने १,२३९ हेक्टर वाढीसह अव्वल स्थान पटकावले आहे. अत्यंत दाट कांदळवन क्षेत्राच्या यादीत पश्चिम बंगाल (९८,१०० हेक्टर) आघाडीवर आहे. त्याखालोखाल अंदमान आणि निकोबार ३९,८००, ओडिशा ८१०० हेक्टर, तामिळनाडू १०० हेक्टर, तर कर्नाटकमध्ये ११ हेक्टर अत्यंत दाट कांदळवन क्षेत्र आहे.

पायाभूत सुविधांच्या नावाखाली होत असलेल्या ढिसाळ विकासकामांमुळे ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कांदळवनाचे नुकसान होत आहे. जमीन बळकावणे आणि भूमाफियांची प्रकरणे यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सरकारची योजना अनेक बारगळली आहे.

बी. एन. कुमारसंचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

Story img Loader