ठाणे : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जा सुधारणांबाबत आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना काही योजना आखल्या होत्या. त्यांची अंलबजावणी करण्यात येईल. तसेच जिल्हा वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या मुद्दय़ावर भर दिला जाईल, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. देसाई यांनी अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील रखडलेल्या कामांची यादी पाठवण्याच्या सूचना केल्या. या कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबबरोबर  ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम दोन टप्प्यांत करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister shambhuraj desai determination problem of traffic jams thane district planning committee ysh
First published on: 30-09-2022 at 01:12 IST