Mira Road Crime: मीरा रोडमधल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली आहे. त्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर काही तुकडे गॅसवर भाजले, काही मिक्सरमध्ये बारीक केले तर काही तुकडे शिजवले. तो तिच्या हत्येचे सगळे पुरावे नष्ट करत होता आणि मात्र शेजारी राहणाऱ्या लोकांना वास येऊ लागला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. मनोज साने आणि सरस्वतीची पहिली भेट २०१४ मध्ये झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं होतं २०१४ मध्ये?

मनोज साने आणि सरस्वती या दोघांची भेट २०१४ मध्ये एका रेशनच्या दुकानावर झाली होती. रेशन दुकानात झालेली ही ओळख पुढे वाढली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सरस्वती अनाथ होती. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं त्यानंतर हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मनोजलाही कुणी नातेवाईक नव्हते. तसंच सरस्वतीही अनाथ होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० वर्षांपासून जास्त काळ हे दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते. तीन वर्षांपासून मीरारोडच्या गीता नगर या ठिकाणी ते राहायला आले. मात्र सरस्वतीला मनोजच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai murder case manoj and saraswati first meeting took place at ration shop in 2014 scj
First published on: 08-06-2023 at 19:32 IST