Natasha Awhad Post: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षाला एकत्रितपणे केवळ ४९ जागा जिंकता आल्या आहेत. तर महायुतीला २३५ हून अधिक जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सातत्याने ईव्हीएमवर आरोप करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा स्वतःचा ९५ हजाराहून अधिकच्या मताधिक्याने विजय झाला आहे. तरीही त्यांनी ईव्हीएमवर शंका घेणारे मुद्दे उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने सोशल मीडियावर यासंबंधी माहिती देत आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडही मैदानात उतरली असून तिने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआचा एवढा मोठा पराभव का केला गेला? याबाबत निरनिराळे दावे केले आहेत.

मविआला ५० च्या खाली का ठेवले?

नताशा आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर निकालावर भाष्य करणारी सविस्तर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “निवडणूक निकालात फेरफार करून भाजपा पक्ष स्वतःला १०० जागा घेऊन शांत बसला असता. पण त्यांनी इतक्या जास्ती जागाच (१३२) लक्ष्य का ठेवले? त्याचप्रमाणे सहकारी पक्ष शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) इतक्या जास्त जागा का वाढवून दिल्या? महाविकास आघाडीला ५० जागांच्या खाली का ठेवले गेले?

jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav Thackeray and Jitendra Awhad
Jitendra Awhad : “शेवटी कोणालातरी…”, पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

“कारण भाजपसाठी ही एक अतिमहत्त्वाची निवडणूक होती आणि काहीही झाले तरी भाजपाला सत्तेत यायचे होते. शिवाय, महायुतीमधील दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाला त्यांच्याशी किंवा महाविकास आघाडीशी सौदा करण्याची संधीच द्यायची नव्हती. यासाठी निकाल इतका हुशारीने तयार करण्यात आला की त्यात भाजपा शिवाय सरकारच स्थापन करता येणार नाही. याची काळजी घेतली गेली”, असे नताशा आव्हाड यांनी म्हटले.

भाजपला जिंकणे इतके महत्त्वाचे का होते?

भाजपाला विजय मिळवणे आवश्यक होते. याचीही तीन कारणे नताशा आव्हाड यांनी सांगितली आहेत. ही कारणे खालीलप्रमाणे..

१. अदाणींनी धारावी प्रकल्प गमावला असता.

२. केंद्रातील त्यांचे सरकार धोक्यात आले असते.

३. भाजपा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल झाला असता.

Natasha Awhad tweet
नताशा आव्हाड यांनी केलेली एक्सवरील पोस्ट

“यामुळे महाराष्ट्राचा निकाल निवडणुकीपूर्वीच दिल्लीत ठरवला गेला. राज्यात झालेल्या निवडणुका हा फक्त दिखावा होता”, अशी टीका नताशा आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

Story img Loader