राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

कळवा-मुंब्य्रातील माजी नगरसेवकांना एक कोटी देण्याबरोबरच नगरसेवक निडणुकीत तिकीट देण्याचे आणि १० कोटी रुपयांची कामे देण्याचे आमिष खुलेआम पैसेवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून दिले जात असून हीच राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी शिंदे गटावर समाजमाध्यमांद्वारे केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>>ठाणे: मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
maval lok sabha marathi news, shrirang barne marathi news
मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातील प्रभावी नेत्यांना गळाला लावण्याची रणनिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आखली जात आहे. मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांनी बंडाची तयारी करीत असून त्यांना शिंदे गटाचा पाठींबा असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवकांचा शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित करत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा >>>अंबरनाथः धाडसी महिलेने बिबट्यापासून केले कुटुंबाचे रक्षण

पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत, असा आरोप आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यावर बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.