scorecardresearch

Premium

ठाण्यातील काही भागात शुक्रवारी पाणी नाही

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले आहे

water supply
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक फोटो, लोकसत्ता)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून हा स्त्रोत महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन वाहीन्या टाकल्या असून त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

आणखी वाचा- डोंबिवलीतील मनसे कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, ठाकरे समर्थक स्तब्ध

हे काम शुक्रवार, २४ मार्च रोजी दुपारी १२ ते शनिवारी, २५ मार्च रोजी दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार असून या कालावधीत ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्रा येथील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसर, वागळे इस्टेट परिसरातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक- २, नेहरुनगर तसेच मानपाडा भागातील कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No water supply some area in thane on friday mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×