ठाणे : खड्डे बुजविण्याची कामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी ठाणे जिल्ह्यात खड्डय़ांमुळे प्राण गमवावे लागण्याचे प्रकार सुरूच आहेत़  भिवंडी शहरातील नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे रविवारी एकाचा मृत्यू झाला़  जिल्ह्यात दीड महिन्यात खड्डयांमुळे पाच जणांना प्राण गमवावा लागला आह़े 

अशोक काबाडी असे भिवंडीत खड्डेबळी ठरलेल्या व्यक्तीचे नाव आह़े  भिवंडी तालुक्यातील कवाड येथील आनगावामधील अशोक हे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुलगी आदिती हिच्यासोबत वंजारपट्टीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी नदीनाका पुलावर आली असता, दुचाकी चालवत असलेल्या आदितीने खड्डयामुळे दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी मागून आलेल्या एका ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात आदिती आणि अशोक हे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अशोक हे रस्त्याच्या उजव्या बाजूस पडले. त्यावेळी त्यांच्या पोट आणि छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आदिती ही रस्त्याच्या डाव्या बाजूस पडल्याने तिचा जीव वाचला. या प्रकरणी आदितीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अशोक यांच्यासह आतापर्यंत पाचजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही
रायगड जिल्ह्यातील १३ मंडळ अधिकाऱ्यांवर शिस्तीसाठी कार्यवाही
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी

खड्डय़ांमुळे अपघात होऊन नागरिकांचे प्राण जाऊ नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या़  मात्र, खड्डय़ांमुळे जीवघेण्या अपघातांचे सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे.

अपघात असे..

* २ जुलै : कल्याण येथील म्हारळ-वरप येथे नारायण भोईर (६५) यांचा खड्डा चुकविताना मृत्यू

* ५ जुलै : घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डा चुकविताना एसटीखाली चिरडून मोहसीन खान यांचा मृत्यू 

* १६ जुलै : कल्याण -बदलापूर मार्गावर अंकित थविया (२६) याचा खड्डयामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू 

* २३ जुलै : मुंबई- नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथे  ब्रिजेशकुमार जैस्वार यांची दुचाकी खड्डय़ात गेल्याने डम्परखाली चिरडून त्यांचा मृत्यू

* ७ ऑगस्ट : नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून ट्रकने दिलेल्या धडकेत अशोक काबाडी (६५) यांचा मृत्यू