scorecardresearch

Premium

तीन शहरांना एकच नगररचनाकार; अंबरनाथच्या नगररचनाकारावर बदलापूर, उल्हासनगरची जबाबदारी

ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे. ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.

urban planner, Ambernath, Badlapur, Ulhasnagar

अंबरनाथः शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन अ वर्ग नगरपालिकांच्या शहर नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे. त्यात त्याच नगररचनाकाराची उल्हासनगरच्या नगररचनाकारपदी प्रभारी नियुक्ती करण्याचा आदेश नुकताच नगर विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे.

ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून घर खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे चौथी मुंबई म्हणून परिचीत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहत आहेत. या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. मात्र या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर अवलंबून असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेत कार्यरत असलेले नगररचनाकार विवेक गौतम यांच्याकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार चार महिन्यांपूर्वी सोपवण्यात आला होता. बदलापुरातील नगररचनाकाराचे पद अधिकाऱ्याच्या निवृत्तीने रिक्त झाले होते. त्यामुळे विवेक गौतम हेच अंबरनाथसह बदलापूर शहराच्या शहर नियोजनाची जबाबदारी सांभाळत होते. त्यातच उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे वैद्यकीय कारणामुळे रजेवर गेले. त्यांच्या रजेमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून नुकतीच नगर विकास विभागाने अंबरनाथ आणि बदलापुरच्या नगर रचना विभागाचे काम सांभाळणाऱ्या विवेक गौतम यांच्यावरच उल्हासनगरचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे आता गौतम यांना अंबरनाथ आणि बदलापूरसह उल्हासनगर शहराच्या नगररचना विभागाचाही कारभार पहावा लागणार आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

दोन अ वर्ग नगरपालिका आणि एक महापालिका अशा तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगररचना विभागाचा कारभार एकाच अधिकाऱ्याला देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा रंगली आहे. आधीच ऑनलाईन बांधकाम परवानगीचा घोळ सुरू असताना बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यात आता एकाच अधिकाऱ्याला तिसऱ्या पालिकेचा कार्यभार दिल्याने या विभागांचे कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

तीनही शहरांमध्ये महत्वाचे प्रकल्प

अंबरनाथ शहरात शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, हॉकी क्रीडांगण, जागतिक दर्जाचा तरणतलाव, नाट्यगृहाचा उर्वरित भाग असे अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहे. त्यांची कामे नगररचना विभागामार्फत सुरू आहेत. बदलापुरात पूररेषेसह इतर काही प्रकल्प सुरू आहेत. तर उल्हासनगरात पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची आशा आहे. या तीनही शहरांचे काम येत्या काळात खोळंबण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 19:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×