ठाणे : ठाणे येथील कापुरबावडी भागातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग जमा झाले असून सोमवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या नाल्यामध्ये उतरून आंदोलन केले. मालदीव, बाली आणि सिंगापूर येथे कचऱ्याच्या ढिगावर शास्रोक्तक पद्धतीने बेट तयार करून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनविण्यात आला असून त्याचधर्तीवर कापूरबावडीच्या नाल्यात तयार झालेल्या कचऱ्याचे बेटाचे लोकार्पण करून ठाणेकरांसाठी नवीन पर्यटन केंद्र खुले करावे, अशी उपहासात्मक मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.
कापुरबावडी भागातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग जमा झाले असून त्याचा त्रास गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा येथील वीस हजार नागरिकांना होत आहे. याठिकाणी कचरा साठून बेट तयार झाल्याचे दिसून येत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी याठिकाणी आंदोलन केले. त्यांनी नाल्यातील या कचऱ्याच्या बेटावर उतरून पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. लवकरात लवकर येथील कचरा स्वच्छ न केल्यास हे कचऱ्याचे ढीग पालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नेऊन टाकले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा >>> ठाण्यातील रस्ते कामांचे आयआयटीकडून पाहणी सुरु
पालिकेच्या वतीने या बेटाचे नामकरण करावे तसेच ठाण्यातील नागरिकांना कचऱ्याचे बेट बघण्याचा अनुभव उपलब्ध करून द्यावा. नागरिकांना महापालिकेच्या स्वच्छ ठाणे