scorecardresearch

Premium

वेळापत्रक नवे, हाल जुनेच!

दिवा रेल्वे स्थानकात यापूर्वी १२ अप आणि १२ डाऊन अशा २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला होता.

Diva station
१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार दिवा स्थानकात ४६ जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला

दिव्यातील ‘जलद’ थांबा प्रवाशांसाठी निरुपयोगी

वाढत्या प्रवासीसंख्येच्या प्रमाणात जास्त सुविधा देण्याच्या हेतूने मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकात सुरू केलेला जलद गाडीचा थांबा दिवावासीयांसाठी कुचकामी ठरत आहे. १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार दिवा स्थानकात ४६ जलद गाडय़ांना थांबा देण्यात आला असला तरी, यातील ७० टक्के गाडय़ा कर्जत-कसारा येथून सुटणाऱ्या किंवा तेथे जाणाऱ्या आहेत. या गाडय़ांना आधीच तुडुंब गर्दी असल्याने त्या दिवा स्थानकात थांबून देखील येथील प्रवाशांना त्यात चढणे अशक्य ठरत आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

दिवा रेल्वे स्थानकात यापूर्वी १२ अप आणि १२ डाऊन अशा २४ फेऱ्यांना थांबा देण्यात आला होता. १ नोव्हेंबरपासून रेल्वेने वेळापत्रक बदलले असून आणखी २२ जलद गाडय़ांना स्थानकात थांबा मिळाला आहे. मात्र, यातील ७० टक्के गाडय़ा या कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव येथून सुटणाऱ्या असल्याने त्यांचा दिव्यातील प्रवाशांना फारसा उपयोग नाही. कारण अप मार्गावर डोंबिवली तर डाऊन मार्गावर ठाणे स्थानकातच पूर्णपणे भरतात. तुडुंब भरलेल्या या गाडीत दिव्यातील प्रवाशांना शिरायला जागाच नसते. त्यामुळे दिव्यातील जलद गाडय़ांचा थांबा कुचकामी ठरला आहे.

ठाण्यात मोठय़ा प्रमाणात कंपन्या आणि उद्योग असल्याने कर्जत, अंबरनाथ, कसारा येथील अनेक जण येथे कामानिमित्ताने येत असतात. त्यामुळे  परतीच्या प्रवासावेळी ठाण्यातून चढणारा प्रवाशांचा लोंढा चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या दिव्यातील प्रवाशांची वाट अडवतो. परिणामी परतीच्या जलद गाडय़ांचाही दिवावासीय प्रवाशांना उपयोग होत नाही.

बदलापूरपेक्षा दिव्यात अधिक गर्दी 

गेल्या काही वर्षांमध्ये दिवा शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण खूप वाढले आहे. किफायतशीर किमतीतील घरांमुळे नोकरदार मोठय़ा प्रमाणात दिव्यात आले. २०१६-१७ ला मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकात दिव्याचा आठवा क्रमांक लागतो. गर्दीच्या स्थानकांमध्ये दिव्याने बदलापूर, शीव आणि विक्रोळी स्थानकांनाही मागे टाकले आहे.

अप मार्गाने जाणाऱ्या गाडय़ा

* कसारा- ८, कर्जत- ५, खोपोली- १, आसनगाव- १, अंबरनाथ-३, बदलापूर- ४  (यात दादर- १), कल्याण- १

* डाऊन मार्गाने जाणाऱ्या गाडय़ा

* कर्जत- ६, कसारा- ५, बदलापूर- ५, अंबरनाथ- ३, टिटवाळा-२, खोपोली-१, आसनगाव-१

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-11-2017 at 04:47 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×