राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पण, आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी ठाण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. बिहारमधील राजकीय घडामोडींवर भाजपचे सुशील मोदी यांनी भाष्य केले आहे. भाजप मित्र पक्षांना धोका देत नाही. पण जे भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते हे महारष्ट्रात पहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. बिहारमध्ये आमच्या पक्षाचे ७५ जण तर जेडीयुचे ४२ जण निवडून आले होते. तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. तिथे आज सरकार गेले आहे. पण, तिथे आमचे सरकार पुन्हा येईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real shiv sena along with us deputy chief minister fadnavis pinched uddhav thackeray amy
First published on: 10-08-2022 at 14:39 IST