उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भूसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून मोबदल्याचा अपहार केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक झाली आहे. मात्र यात आता एका निवृत्त नायब तहसीलदार दर्जाच्या कर्मचाऱ्याचीही चौकशी सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हा कर्मचारी काही महिन्यांपूर्वी निवृत्त होऊनही कार्यालयाच्या आवारात त्याचा वावर होता. प्रक्रियेची माहिती असल्याने यात त्याचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाण्याचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाची उभारणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बनावट कागदपत्रे सादर करून मृत व्यक्तीच्या नावे मोबदला मिळवण्याचा प्रयत्न येथील भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी हाणून पाडला. कागदपत्रांच्या छाननीत संशय आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired employees in land acquisition embezzlement zws
First published on: 25-05-2022 at 00:40 IST