मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींची दळणवळणाची समस्या सुटली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोपऱ्याच्या वाडीला साकवचा आधार मिळाल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या दळणवळणाच्या समस्येतून स्थानिकांची सुटका झाली आहे. कल्याण शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर असलेल्या मलंगगडाच्या कुशीत अनेक आदिवासी पाडे आहेत. मात्र शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या या पाडय़ांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. मलंगगड पट्टय़ातील कोपऱ्याची वाडीमधील आदिवासींना वाडीत जाण्यासाठी मोठा ओढा ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात या ओढय़ाला पाणी आल्यानंतर वाडीचा गावाशी संबंध तुटत असे. यामुळे अनेक नागरिक आणि गुरांना जीव गमवावा लागला होता. याविषयी ‘लोकसत्ता ठाणे’मधील ‘वेशीवरचे गावपाडे’ या सदरात आदिवासी बांधव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ओढय़ावर साकव बांधून दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road build for tribal village near malang for transportation
First published on: 07-04-2017 at 02:56 IST