ठाणे – जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय येथे बाह्ययंत्रणेव्दारे कर्मचारी नेमून रुग्णसेवा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर रुग्णालयातील बाहय रुग्णाच्या तपासणीवर परिणाम होणार नाही व नागरिकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घ्यावी.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य संघटनेचे (एनआरएचए) कर्मचारी संपात सहभागी असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्याच्या जागी बाहय यंत्रणेव्दारे कर्मचारी नियुक्ती करण्यात यावी. अशा स्पष्ट सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनांच्या निधी वितरणाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना हे आदेश दिले आहेत. राज्यभरात जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे अनेक शासकीय कार्यालय, रुग्णालय येथील काम अत्यंत धीम्या गतीने तर काही ठिकाणी जवळपास ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आणि जिल्हा वार्षिक योजनांच्या निधी वितरणाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली.
यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. या संपामुळे ठाणे
जिल्हा वार्षिक योजनांचा निधी १०० टक्के खर्च करा : पालकमंत्री
निधीचा योग्य नियोजन करून कोणताही निधी अखर्चिक राहणार नाही, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. ज्या योजनेत खर्च होत नसेल त्या योजनेचा निधी पुनर्विनियोजनाव्दारे इतर योजनेला देण्यात यावा. तसेच साकव योजनेचा खर्च न होणारा निधी जिल्हा परिषद रस्त्यासाठी पुनर्विनियोजन करण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) ७८ टक्के, अदिवासी उपयोजना ८० टक्के व विशेष घटक योजना ९७ टक्के खर्च झाला असल्याने उर्वरित निधी खर्च करण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. तसेच जे विभाग निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी केली.