ठाणे : देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे. महिषासुराचे मर्दन करणारी आहे. महाराष्ट्रात जे जे महिषासुर निर्माण झाले आहेत. त्यांचे मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. मागील वर्षी वातावरण वेगळे होते. मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत.

आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी बनावट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आमचा एक नेता, एक झेंडा, एक मैदान असल्याचेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना दिले आहे. मी सुद्धा मराठवाड्यातील आहे. मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे. आम्ही मराठवाड्यातील लोक या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचे दानवे यावेळी म्हणाले.

Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Samana Shekhar in the beginning of the lecture mentioned the four values ​​of equality, independence, justice, fraternity in the preamble of the constitution.
विधि विशेषज्ञ समान शेखर म्हणतात “संविधानिक मूल्यांअभावी अखंडता धोक्यात येईल”
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Karuna Munde on dhananjay munde bandra family court order
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांना पोटगी द्यावी लागणार; पत्नी करुणा मुंडेंचे आरोप न्यायालयाकडून अंशतः मान्य
PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण

हेही वाचा >>> ठाणे: देवी आगमन मिरवणुकीत दोन मंडळात राडा; दगडफेक आणि फटाके पेटविल्याने पाच जखमी

भाजपचे आशिष शेलार यांच्यावरही दानवे यांनी टीका केली. आशिष शेलार यांना इतिहास कमी माहिती असेल, आज एनडीएमध्ये कोणत्या विचारांचे कोणते पक्ष सामील आहेत, हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा सरकार स्थापन केले, त्यात मुलायम सिंग होते, फर्नांडिस, दंडवते होते ते कोणत्या विचारांचे होते. हे सर्व समाजवादी विचारांचे होते आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचे दानवे म्हणाले.

Story img Loader