डोंंबिवली : भारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे होणारा हा परिवर्तनाचा प्रवास समाज, राष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा आहे. देश, जगासमोर सन्मान वाढविण्याची संधी भारत देशाला मिळणार आहे. आपल्या मूळ हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला तर भारत सुपरपाॅवर नव्हे तर सुपरराष्ट्र होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी मंगळवारी येथे केले.

मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या सेवानिवृत्त प्रमुख डोंबिवली निवासी डाॅ. शुभदा जोशी यांच्या जीवनपटावर त्यांची बहिण नंदिनी पित्रे यांनी ‘शुभपर्व’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली जीमखाना येथील कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची उपाध्यक्ष डाॅ. विनय सहस्त्रबुध्दे, डाॅ. शुभदा जोशी, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

manbendra nath roy influenced on tarkteerth lakshman shastri joshi zws 70
तर्कतीर्थ विचार : मार्क्सवाद व नवमानवता
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
IND vs ENG Abhishek Sharma break Rohit Sharma record Most sixes for India in a T20I
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला हिटमॅनचा खास विक्रम! टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम
mohan bhagwat
एका-दोघांमुळे राष्ट्र मोठे होत नाही- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हेही वाचा…डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक

भारत सुपरपाॅवर झाला पाहिजे असे आपण म्हटल्यावर, एका विचारवंताने आपणास ‘तुम्ही ज्या पठडीतून जात आहेत त्या शिकवणुकीत, संस्कृतीच्या सूत्रसंकल्पनेत कोठे सुपरपाॅवर शब्द दिसला आहे का,’ असा प्रश्न केला. त्यावेळी आपण स्तब्ध झालो. आपली हिंदु धर्म संस्कृती ही विचार, तत्वज्ञान, ज्ञान, संस्कृती, समाज रक्षण, विकास अशा अनेक मुल्यांवर उभी आहे. जग या संस्कृतीपासून प्रेरणा घेत आहे. आपले मूळ चिंतन ही हिंदू धर्म, संस्कृती. आपल्या मूळ चिंतन, विचारात नसलेल्या सुपरपाॅवर पेक्षा भारत सुपर राष्ट्र झाला पाहिजे, असे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया भक्कम होता. त्यामुळे बाह्य कितीही आक्रमणे झाली तरी काही पतनाचा काळ सोडला तरी आपण खंबीर राहिलो. हजारो वर्षाची परंपरा भारताला आहे. ती आपण विसरता कामा नये. समाज सुधारकांनी केलेल्या कामामुळे हिंदू धर्म कधी संंपला नाही. संस्कृती संवर्धनासाठी ज्या व्यवस्था उभ्या राहिल्या त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. हेच संवर्धनाचे काम यापुढे डाॅ. शुभदा जोशी यांसारखी मंडळी करतील, असे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा…डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले

मुंबई विद्यापीठातील तत्वज्ञान विभाग विकसित करण्यात डाॅ. शुभदा जोशी यांचा मोलाचा वाटा आहे. प्रसिध्दीच्या विविध तंत्राने समाज पुढे जात असताना डाॅ. शुभदा जोशी यांनी तंत्रापेक्षा मंत्राला किती महत्व आहे. हे या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. भविष्यवेधाचा विचार करून डाॅ. जोशी यांनी हिंदुत्व विषयावर लिखाण करावे, असे डाॅ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले

Story img Loader