ठाणे : MSBSHSE 10th Result दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून यंदाच्या वर्षी ५७ हजार ३३९ मुले तर, ५३ हजार ८४३ मुली असे एकूण १ लाख ११ हजार १८२ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या ५२ हजार ७४३ तर, ५१ हजार ३५९ मुलींची संख्या आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ इतके आहे. यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे निकालातून दिसून येते.

in Thane 2 810 received Lake Ladki Yojana benefits
ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ हजार लाडक्या लेकींना मिळाला लाभ, लेक लाडकी योजनेचे काम प्रगतीपथावर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
Economy Growth rate likely to fall to 6 4 percent
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार! विकासदर ६.४ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता
Seven lakh farmers deprived of loan waiver
सात लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
Mumbai, Increase in PM 2.5 levels,
मुंबईत पीएम २.५ च्या पातळीत वाढ
Image of Indian economy graphics or related visuals
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची शक्यता : सरकारचा अंदाज

दरवर्षी निकालात होतेय घट

गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. त्याच्या आधीच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९९. २८ टक्के इतका निकाल लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी निकालात दोन टक्क्यांनी घट झाली होती. यंदाच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षी निकालात घट होताना दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर आणि कल्याण ग्रामीण आघाडीवर

संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक निकाल लागला आहे. मिरा-भाईंदरचा निकाल ९६.२२ टक्के तर, कल्याण ग्रामीणचा निकाल ९५.३४ टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल भिवंडी तालुक्याचा लागला असून या तालुक्याचा निकाल ९० टक्के लागला आहे.

शहर निहाय निकाल टक्केवारीत

तालुक्याचे नाव          उत्तीर्ण मुले      उत्तीर्ण मुली     एकुण निकाल

कल्याण ग्रामीण          ९४.४८          ९६.३०          ९५.३४  

अंबरनाथ                 ९२.७४          ९५.६२          ९४.११

भिवंडी                    ८९.५५          ९४.५७          ९१.९६

मुरबाड                   ९१.६३          ९५.०७           ९३.३०

शहापूर                   ९१.६४          ९५.५२           ९३.५२ 

ठाणे महापालिका क्षेत्र   ९०.८३          ९४.११           ९२.४२

नवी मुंबई                ९४.०४          ९६.३२           ९५.१२ 

मीरा भाईंदर              ९५.२१          ९७.३३           ९६.२२

कल्याण डोंबिवली    ९३.८०      ९६.२४        ९४.९८

उल्हासनगर        ८८.७५      ९३.९१       ९१.३४

भिवंडी पालिका क्षेत्र  ८५.८९     ९४.०८       ९०.००

एकुण              ९१.९८     ९५.३८       ९३.६३

Story img Loader