scorecardresearch

Premium

Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

Maharashtra SSC 10th Result 2023 गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तीन टक्क्यांनी घसरण

MSBSHSE 10th Result
महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल २०२३

ठाणे : MSBSHSE 10th Result दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून यंदाच्या वर्षी ५७ हजार ३३९ मुले तर, ५३ हजार ८४३ मुली असे एकूण १ लाख ११ हजार १८२ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या ५२ हजार ७४३ तर, ५१ हजार ३५९ मुलींची संख्या आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ इतके आहे. यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे निकालातून दिसून येते.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

दरवर्षी निकालात होतेय घट

गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. त्याच्या आधीच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९९. २८ टक्के इतका निकाल लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी निकालात दोन टक्क्यांनी घट झाली होती. यंदाच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षी निकालात घट होताना दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर आणि कल्याण ग्रामीण आघाडीवर

संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक निकाल लागला आहे. मिरा-भाईंदरचा निकाल ९६.२२ टक्के तर, कल्याण ग्रामीणचा निकाल ९५.३४ टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल भिवंडी तालुक्याचा लागला असून या तालुक्याचा निकाल ९० टक्के लागला आहे.

शहर निहाय निकाल टक्केवारीत

तालुक्याचे नाव          उत्तीर्ण मुले      उत्तीर्ण मुली     एकुण निकाल

कल्याण ग्रामीण          ९४.४८          ९६.३०          ९५.३४  

अंबरनाथ                 ९२.७४          ९५.६२          ९४.११

भिवंडी                    ८९.५५          ९४.५७          ९१.९६

मुरबाड                   ९१.६३          ९५.०७           ९३.३०

शहापूर                   ९१.६४          ९५.५२           ९३.५२ 

ठाणे महापालिका क्षेत्र   ९०.८३          ९४.११           ९२.४२

नवी मुंबई                ९४.०४          ९६.३२           ९५.१२ 

मीरा भाईंदर              ९५.२१          ९७.३३           ९६.२२

कल्याण डोंबिवली    ९३.८०      ९६.२४        ९४.९८

उल्हासनगर        ८८.७५      ९३.९१       ९१.३४

भिवंडी पालिका क्षेत्र  ८५.८९     ९४.०८       ९०.००

एकुण              ९१.९८     ९५.३८       ९३.६३

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 14:51 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×