जमीन खरेदी प्रकरणात कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांची आर्थिक फसवणूक झाली. आता या प्रकरणी उल्हासनगरमधील पिता पुत्राला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मोहन रूपानी व भारत रुपानी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गवळी यांचे वडील अनंता गवळी यांनी उल्हासनगरमधील पिटूमल रूपानी यांच्याकडून ४ वर्षापूर्वी कल्याण पूर्वेतील नांदिवली येथे ६६,००० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. दरम्यानच्या काळात खरेदीदार अनंता यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ पिटूमल यांचेही निधन झाले. याचा पिटूमल यांचे नातेवाईक मोहन व भारत रूपानी यांनी गैरफायदा घेतला. तसेच मृत पिटुमल व अनंता यांच्या विक्रीची बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार करून सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आणि जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

सरकारी कागदपत्रात हेराफेरी करून फसवणूक

कायद्याने पिटूमल यांनी अनंता गवळींना विकलेली जमीन वारस म्हणून नवीन गवळी यांच्या नावावर होणे आवश्यक होते. हा हेराफेरीचा प्रकार लक्षात आल्यावर नवीन गवळी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. चौकशीत मोहन व भारत रूपानी यांनी सरकारी कागदपत्रात हेराफेरी करून तक्रारदार नवीन गवळी यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : बीडमध्ये वक्फ जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह वडिलांविरुध्द गुन्हा दाखल

गुन्हे शाखेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोहन व भारत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहन व भारत फरार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ५ वर्षानंतर अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.