ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी (२१ मे) यादिवशी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, यंत्रणांची दुरुस्ती कामे केली जाणार आहे. त्यामुळे, बुधवारी १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, कारागृह, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इटर्निटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.