भिवंडी येथील टेंभीवली भागात कोळशाचा ट्रक रिकामी करत असताना झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्यात अडकून तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर तुटल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर घरातील सर्व सदस्य कोळशाखाली गाडले गेले होते. घरातील इतर सदस्य वाचले, मात्र तीन मुलींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभीवली येथील एका झोपडीमध्ये बालारा वळवी हे पत्नी, मुलगा आणि तीन मुलींसोबत राहत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या झोपडीलगत कोळशाने भरलेला ट्रक रिकामी करताना ट्रकमधील कोळसा त्यांच्या झोपडीवर पडला. या घटनेत वळवी कुटुंबीय ढिगाऱ्यात अडकले. स्थानिकांनी त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Death of a person Bhadravati Taluka
चंद्रपूर : पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला

यानंतर जखमी अवस्थेत मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.