साकेत पूलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून नवी मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहे. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून या मार्गावर ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते माजीवडा आणि भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकवेर साकेत पूल ते भिवंडीतील अंजूर दिवे पर्यंत वाहतूक कोंडीत झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चालकांना बसत आहे.