महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्यादरम्यान वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले आहेत. ९ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. तर, २ झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे ठाण्यात वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते. त्यानंतरही मुसळधार पावसादरम्यान शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरात संपूर्ण शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यानंतर शहरात वृक्ष पडण्याचे सत्र थांबले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढताच वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले आहेत. ९ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. तर, २ झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याचे पुनर्रोपण करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाला उन्मळून पडलेली वृक्ष पाहणीदरम्यान धोकादायक असल्याचे दिसून आले नव्हते का आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी काय उपयोजना केल्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.