लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: भिवंडी येथील रांजनोली नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. प्रसाद चौवले (२६) आणि किरण कोंडा (२७) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

रांजनोली नाका येथील पूलाखाली दोन जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी दोघेजण एका कारमधून येत होते.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

पोलिसांनी ही कार अडविली. त्या कारमध्ये ४१ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारमधील प्रसाद आणि किरण या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.