एमएमआरडीएच्या विकास आराखडय़ाची अंमलबजावणी मात्र सक्तीची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तन आणि आसपासच्या गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात आलेल्या मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) गाशा शासनाकडून गुंडाळण्यात आला आहे. आता गोराई, मनोरी ही गावे पुन्हा मुंबई महापालिकेत आणि उत्तन, डोंगरी, पाली, चौक, धारावी या गावांची जबाबदारी पुन्हा मीरा-भाईंदर महापालिकेकडे असेल. मात्र एमएमआरडीएने तयार केलेल्या विकास आराखडय़ाची अंमलबजावणी मात्र सक्तीची करण्यात आली आहे. या आराखडय़ात बदल करण्याचा अधिकार महापालिकांना नसेल आणि काही बदल करावयाचा असल्यास एमएमआरडीएची परवानगी घेणे आवश्यक आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttan gorai area included again in municipal corporation
First published on: 22-03-2017 at 01:14 IST