जुलै महिन्याच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धरण भरण्याचा मंदावलेला वेग वाढला आहे. ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाचा असलेल्या बारवी धरणात मंगळवारी ३०९.४० दशलक्ष घनमीटर इतका पाठीसाठा होता. त्यामुळे धरण ९१.३१ टक्के इतके भरले आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या आठवडाभरात धरण भरण्याची आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि विविध गावांना बारवी धरणातून पाणी पुरवठा होता. सोबतच ठाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वर्षाचे नियोजन होण्यासाठी बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षात पावसाने जून महिन्यात दांडी मारली. त्यामुळे धरणाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणावर खालावला होता. जुलै महिन्याच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुलै महिन्यात पाऊस पडला नसता तर ऐन पावसाळ्यात पाणी कपातीची परिस्थिती ओढावली असती. मात्र जुलै महिन्यात बारवी धरणात समाधानकारक पाऊस पडला. सुरूवातीच्या दोन आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बारवी धरण झपाट्याने भरले.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water storage in barvi dam which supplies water to thane district is at 91 percent msr
First published on: 09-08-2022 at 10:14 IST