दुसऱ्यांदा पारा ९ अंशाखाली, मंगळवारी ८.९ अंश सेल्सियसची नोंद

बदलापूर : उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा घसरला असून मुंबई महानगर प्रदेशात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शहरात मंगळवारी सकाळी ८.९ अंश सेल्सियसची नोंद झाली. खासगी हवामान अभ्यासकांनी केलेल्या नोंदीनुसार मुंबई महानगर प्रदेशात सर्वात थंड शहर म्हणून नोंदवले गेले आहे. पंधरा दिवसांपूर्वीही बदलापूर शहराचा पारा ९ अंशावर आला होता.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

गेल्या काही महिन्यांमध्ये वातावरणातील बदलांमुळे तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी इराण आणि बलुचिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबईपासून ते थेट नाशिकपर्यंत धूळयुक्त वातावरण जाणवले होते. धुळीचे प्रमाण इतके होते की, त्यामुळे दृश्यमानता घटल्याचे दिसून आले होते. या धुळीच्या वादळाचा परिणाम सोमवारी काही अंशी घटल्यानंतर तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली. उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली गेली आहे.

निसर्गरम्य म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहरात मंगळवारी गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. मंगळवारी बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत शहराचे तापमान ८.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये सर्वात कमी नोंदवले गेलेले तापमान हे बदलापूर शहरातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पश्चिम विक्षोप आणि नंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव आहे. येत्या दोन दिवसांनंतर पुन्हा तापमान सर्वसाधारण अंश सेल्सियसवर येऊन थांबेल.

– अभिजीत मोडक, खासगी हवामान अभ्यास, कोकण हवामान