वर्षां सहल म्हटल्यावर नगर जिल्हा कधी कुणाच्या डोळय़ांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. पण या शहराच्याच जवळ असलेला हा मांजरसुबा किल्ला भवतालच्या ओसाड माळावरही या दिवसात वेगळा भासतो.पर्जन्य सहल आणि तीसुद्धा अहमदनगरला म्हटलं तर कोणीही वेडय़ातच काढील, पण खरोखरच नगरच्या अगदी जवळ नगर-वाम्बोरी रस्त्यावरील मांजरसुबा हा किल्ला आणि जवळील डोंगरगणला भेट द्याल तर थक्कच व्हाल. एका नयनरम्य ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद नक्कीच होतो.जुलै ते सप्टेंबर हा काळ फारच छान. हा किल्ला पूर्वीच्या नगर- औरंगाबाद आणि नगर-मनमाड या दोन्ही व्यापारी आणि लष्करी महत्त्वाच्या मार्गावर मोक्याच्या जागी आहे. दोन्ही मार्गावरील एक एक घाट या किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातात. टेहळणी आणि घाटमार्गाचे संरक्षण याकरिता अगदी मोक्याची जागा.या किल्ल्याचे खरे नाव ‘मजार-ए-सुबा’ अपभ्रंश मांजरसुबा. साधारणपणे पर्वतीइतकाच उंच. चढण अतिशय सोपी. किल्ला दुर्गम नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे एक चिरेबंदी बांधकामाची आजही सुस्थितीतील इमारत आहे. येथे कचेरी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असावे. या इमारतीच्या गच्चीवर जाता येते. येथून दूरवरचा प्रदेश निरखता येतो. या किल्ल्यावर एक भव्य दुमजली महालही आहे, पण आज तो पूर्णपणे पडलेला आहे. पणत्याच्या भिंती तो किती देखणा असावा याची साक्ष देतात. हे निजामशाहीतील बांधकाम नगरमधील ‘फरहाबाग’ या सुंदर राजवाडय़ाशी साम्य दाखवते.आपले स्वत:चे वाहन असल्यास आपण फरहाबाग या ऐतिहासिक महत्त्वाच्या व सुस्थितीतील वास्तुलाही याच सहलीत भेट देऊ शकता. या किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जलतरण तलाव आणि हमामखाना. आज ह्य़ा हमामखान्याची पडझड झाली आहे. पण एक गोष्ट जाणवते की नगरसारख्या निपाणी प्रदेशात आणि तेसुद्धा टेकडीवर हमामखाना आणि जलतरण तलाव कसा? आणि हेच येथील नवल आहे. या टेकडीच्या उत्तरेला पावसाचे पाणी अडवून त्याची साठवण टाकी खोदून केलेली आहेत. याकरिता निजामशाहीत अरबस्तानातून जलसंधारणतज्ज्ञ बोलावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अहमदनगरमधील पाणीपुरवठा योजना अमलात आली. उत्तरेकडील रंगमहालातील मोटेच्या सहाय्याने हे पाणी उचलले व खेळवले जाई. आजही येथे मुबलक पाणीसाठा असतो. या पाणसाठय़ाकडे जाण्यास एक भुयारी जिना असून पुढे डोंगरकडय़ाच्या बाजूने अवघड रस्ता आहे. किल्ल्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून हे लष्करी ठाणे तसेच विलासक्रीडा स्थान असावे. किल्ल्याच्या वरील व पायथ्याशी असलेल्या छोटेखानी पठारांवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये अनेक रंगीबेरंगी रानफुलेही आढळतात.या किल्ल्याच्या पायथ्याजवळील डोंगरघळीत विसावले आहे निसर्गरम्य निवांत ठिकाण डोंगरगण. येथे एक जागृत शिवमंदिर आहे. येथे श्रावणात यात्रा भरते. येथे पावसाळ्यातील पाण्याचे प्रवाह आणि  छोटेखानी धबधबा आपल्याला सुरक्षित जलक्रीडेचा आनंद देतात. येथे असलेल्या एका गुंफेला सीतेची न्हाणी म्हणतात. येथेही आपल्याला फार चढउतार करावी लागत नाही. अहमदनगर परिसरात पाऊस फारच कमी असतो, पण ही वर्षांसहल मात्र नक्कीच संस्मरणीय होईल. याशिवाय अहमदनगरमध्ये अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणांनाही आपण भेट देऊ शकतो.

 

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच