मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास अकरा वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते, त्या वेळी इतर ९ दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आली. आज अकरा वर्षांनंतरही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. आज सकाळपासूनच नेटकरी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून या हल्ल्यात बळी गेलेल्या तसेच मुंबईच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण करत आहेत आणि त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनीदेखील त्यांना आदरांजली वाहिली. Remembering the bravehearts and the innocent civilians who lost their lives during the 26/11 attacks. Gone but never forgotten. — Virat Kohli (@imVkohli) November 26, 2019 A silent prayer for those who lost their lives untimely on 26/11 #MumbaiTerrorAttack and the brave heroes who sacrificed their life to protect us. — cheteshwar pujara (@cheteshwar1) November 26, 2019 Still remember how the city came to a standstill during the 26/11 attacks. The exemplary courage shown by security forces deserves huge respect. Let our prayers always be with them. — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) November 26, 2019 Tributes to our brave officers and citizens who sacrificed their lives for our safety, 11 years ago, today. Salute to the brave hearts of our country! #MumbaiTerrorAttack #MumbaiAttacks — Ishant Sharma (@ImIshant) November 26, 2019 26/11 took innocent lives as it gave birth to unsung heroes and martyrs who continue to inspire us with their valour. My salute to those who gave up their lives to protect us. We will always remember you fondly. #MumbaiTerrorAttack pic.twitter.com/i5EN7Q4fdx — Suresh Raina (@ImRaina) November 26, 2019 याशिवाय, आजचा २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकारकडून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त संविधान गौरवाचे कार्यक्रम, संविधान गौरव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. संविधान दिनानिमित्त आज संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार आहेत. मात्र राज्यातील सत्तास्थापनेवरुन झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात दर दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून याचा परिणाम दिल्लीतही जाणवत आहे. एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेने संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वात काही विरोधी पक्षदेखील संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.