भारतीय लष्कर आणि चिनी लष्करातील सैनिकांमध्ये १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान ठार तसेच जखमी झाले. मात्र भारत चीनदरम्यानच्याया संघर्षानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने भारत चीन सीमेवर काय सुरु आहे हे जनतेला सरकारने स्पष्टपणे सांगावे अशी मागणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतामध्ये घुसखोरी केलेली नाही असं वक्तव्य केलं. यानंतर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींनी जपून वक्तव्य करावीत असा सल्ला दिला. मात्र मनमोहन सिंग यांच्या या सल्ल्यावर २२ जून रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विटवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र चार दिवसांपूर्वी नड्डांनी केलेलं हे ट्विट सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. या ट्विटमधील 43000 km हा शब्द सध्या ट्विटवर ट्रेण्ड होत आहे. हा शब्द वापरुन मागील काही तासांमध्ये हजारो ट्विट करण्यात आल्याने तो ट्विटवर ट्रेण्डींगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मनमोहन सिंग काय म्हणाले होते “पंतप्रधानांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आपल्या शब्दांचा वापर चीनला भारताचं समर्थन म्हणून वापरण्याची संधी पंतप्रधानांनी देऊ नये. नियंत्रण रेषेवरील समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पर्याय वापरावेत तसंच ते चिघळू नयेत यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे,” असं डॉ. मनमोहन सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या टीकेत म्हटलं होतं. काय आहे नड्डा यांच्या ट्विटमध्ये. त्यांच्या पत्रानंतर भाजपाध्यक्षांनी काही टि्वट करून काँग्रेस आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलं होतं. “४३ हजार किमी भारतीय भूमी चीनला बहाल करणाऱ्या काँग्रेस पक्षाचेच डॉ. मनमोहन सिंग हे नेते आहेत. यूपीएच्या काळात कोणतंही युद्ध न होता आपला भूभाग गमावला. सातत्यानं आपल्या सैन्य दलांचा अपमान केला गेला,” असं नड्डा म्हणाले होते. Dr. Manmohan Singh belongs to the same party which: Helplessly surrendered over 43,000 KM of Indian territory to the Chinese! During the UPA years saw abject strategic and territorial surrender without a fight. Time and again belittles our forces. — Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 22, 2020 नड्डा यांच्या या ट्विटमधील ४३ हजार किमी आकड्यावरुन आता नेटकऱ्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका केली आहे. ४३ हजार किमी हे अंतर पृथ्वीच्या एकूण परिघापेक्षा तीन हजार किमी जास्त असल्याचे म्हणतं नड्डा यांना ट्रोल केलं आहे. १) कोणता टेप वापरतात हे? The measuring tape used to measure “43000 KM” region is the same used to measure 56 inch ka seena. FACT: Equatorial Circumference of Earth is 40,075 KM. pic.twitter.com/fO4rhWAMZ4 — Swapnay Bargi (@SwapnayBargi) June 26, 2020 २) ट्विट करुन गंमत पाहताना Jp nadda while watching their followers for appreciating his tweet by retweeting & likes on which he mention 43000 KM Land of indian territory !! pic.twitter.com/QrqXUIONou — Aarti Yadav (@abechalnayrr) June 26, 2020 ३) संपूर्ण भूगोल 43000 km.. Seems Nadda ji has a degree in 'Entire Geography'..#Nadda pic.twitter.com/KYdJV2CKqt — Luv singh (@Lavi19259837) June 26, 2020 ४) पहिली प्रतिक्रिया 43000 KM of Indian territory?? Where did you get those Cheap Thrills man? pic.twitter.com/hvAxXlU663 — Sourav Sahana/ সৌরভ সাহানা (@Souravert) June 26, 2020 ५) हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत This man is national president of BJP and his knowledge of geography . 43000 KM is almost entire earth. Why BJP members are mostly uneducated and spread fake news ??#PadhnaLikhnaSeekho — Manmohan Singh (@PManmohansingh) June 26, 2020 नक्की वाचा >> 'हा' व्हिडिओ पाहून जिनपिंग म्हणतील, "चिनी सैनिकांचे ओव्हर अॅक्टींगचे ५० रुपये कापा" ६) जरा ही गोष्ट ध्यानात घ्या China Has Capture 43000 Km Land In India During Congress Rule - @JPNadda Hey Mister The Total Circumference Of The Earth Is 40075 Km — Ananya Jatav (@jatav_ananya) June 25, 2020 ७) श्रीनगर ते कन्याकुमारी From Srinagar to kanyakumari, its only 3200 kms pic.twitter.com/ojp0Vu72Jb — Ebenezer Samuel (@ebenezersamuell) June 22, 2020 ८) कराची ते बिजिंग पडलं तरी Naada ji, Congress must have done really bad. Imagine the distance between Karachi and Beijing is only 4860 km. So what must have been 43000 km. pic.twitter.com/tSI5hFaVQw — Tabrez I Padvekar (@tttabrez) June 25, 2020 ९) भारताचे एकूण क्षेत्रफळ @TweetsMrv bro.unga BJP periya position la eruka aaloda poi parunga with proof..Ipdi dan padipu arivu illadhavungala yematha vendiyadhu!! Ana konjam ipdi research panna BJP oda thandavalam lam kalandrum pic.twitter.com/musAlR3tOT — Kathii Ben (@johnywalker96) June 26, 2020 १०) इतिहास बंद करा When will BJP stop living in history??? In 6 years of BJP rule every neighbour is showing red eye . Even Nepal re-drawn map with Indian territory. Nepal about to change citizenship law for Indians .. even a small small country like Nepal showing Red eye . — sanjay (@sksingh56) June 22, 2020 ११) परत सुरुवात करा शाळेत जायला Need to Join Primary school ASAP. pic.twitter.com/wBdgAZG2WZ — Aman Kumar (@amankumar_4) June 26, 2020 भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसेनंतर सरकार समर्थक आणि विरोधक मागील अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीने ट्रेण्डच्या माध्यमातून एकेमकांच्या विरोधात वक्तव्य करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष टोलाटोलवीबरोबरच आता ट्विटवर हॅशटॅगच्या माध्यमातूनही एकमेकांवर टीका केली जात आहे.