बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्या प्रकरणाचा आधार घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुंबई असुरक्षित असल्याचं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी एक खास फोटो ट्विट करत विशेष संदेश दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस साडी परिधान करून बसल्या आहेत. “सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है !”, अशा ओळी त्यांनी फोटोसह ट्विट केल्या आहेत. त्याचसोबत #everydayiswomansday हा हॅशटॅग वापरून महिला दिन केवळ एक दिवस नसतो, तर प्रत्येक दिवस हा महिलांचाच असतो, असे त्यांनी लिहिले आहे. याच फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी #courage (धाडस / साहस) हा हॅशटॅगदेखील वापरला असून स्त्री स्वत:चे रक्षण करण्यासाठी सक्षम असते असा संदेश त्यांनी फोटो आणि ओळींतून दिला आहे.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

सुशात सिंi राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. यावरून मुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली. त्यानंतर, बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय नियमाला धरुन आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले होते.

याच मुद्द्याला धरून अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले होते.