पौराणिक कथांचे अभ्यासक, लेखक देवदत्त पटनायक यांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आपल्या पौराणिक कथा, देव, संस्कृती, श्रद्धा यांसारख्या विषयांचे सखोल विश्लेषण केले. तसेच महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का? या कथा हजारो वर्षांनंतरही इतक्या लोकप्रिय का आहेत? मृत्यूनंतर माणसाचं काय होत? भीष्म पितामह यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेली शिखंडी कोण होती? यांसारख्या अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या मुलाखतीमध्ये मिळतील. ही विशेष मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.