एखाद्या चित्रपटात घडवा असा प्रसंग केरळातील कोझिकोडेमधील आडिकोल्ली गावात घडला आहे. त्या वृक्तीला मृत समजून अंत्यसंस्कार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कार झाल्यानंतर १५ दिवसांनी तो व्यक्ती घरी परतला. सर्वजन अचंबित झाले मात्र, ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो व्यक्ती दुसराच कोणी होता.

त्या व्यक्तीचे साजी असं नाव असून ३ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेला होता. घरात्यांनी त्याचा शोध घेतला मात्र कहीही संपर्क झाला नाही. काही दिवसांनतर बैराकुप्पा जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो साजीचाच मृतदेह असल्याचा समज कुटुंबीयांना झाला. कुटुंबीयांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला. १६ ऑक्टोबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर पंधरा दिवसांनीच साजी घरी परतला, त्याला समोर पाहून घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

‘मी घराकडे परतत होतो त्यावेळी पनामारम बसथांब्यावर माझी आणि चुलत भावाची भेट झाली, त्याने सर्वप्रथम मला पाहिले आणि नंतर पाहतच राहिला. घरच्यांनी माझे अंत्यविधी केले असल्याचं त्याच्याकडूनच कळलं. हे ऐकून मला धक्काच बसला, असं साजीनं सांगितलं.’