राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र थेट लॉकडाउन न लावता बुधवारी राज्य सरकारने कठोर निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली. यामध्ये कार्यालयातील उपस्थितीपासून लोकल प्रवासाला बंदी ते लग्न समारंभांपासून अत्यावश्यक सेवेतील लोकांसंदर्भातील अनेक नियमांचा समावेश आहे. मात्र या नियमांपैकी लग्नांसंदर्भातील नियम सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. २२ एप्रिल सायंकाळी आठ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू असणाऱ्या या नियमांमध्ये लग्न दोन तासात उरकण्यास सांगण्यात आलं आहे. सोशल मिडियावर यावरुनच अनेकांनी मुख्यमंत्रीसाहेब, लग्न दोन तासात कसं उरकायचं तुम्हीच सांगा असं म्हटल्याचं दिसत आहे. लग्नासंदर्भातील नियम काय लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये करता येणार आहे. तसेच लग्न समारंभातील सर्व विधी दोन तासांमध्येच पूर्ण करणं नवीन नियमांनुसार बंधनकारक आहे. संपूर्ण लग्नाचा कार्यक्रमासाठी केवळ दोन तासांचा अवधी देण्यात आला आहे. या लग्नासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. लग्नांसंदर्भातील या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला (वधू-वर) ५० हजार रुपये दंड ठोठवला जाईल. तसेच हॉल व्यवस्थापनावरही कारवाई करण्यात येणार असून दोषी आढळल्यास करोना महामारीची परिस्थिती सामान्य होईपर्यंत हॉलवर बंदी घालण्यात येईल. याच कठोर नियमांवरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच खळबळ उडाल्याचं चित्र दिसत आहे. अनेकांनी दोन तासात लग्न कसं करायचं?, दोन तासात लग्न शक्य तरी आहे का?, अशा गंभीर प्रश्नांबरोबरच मजेदार प्रतिक्रियाही दिल्यात. चला पाहुयात कोणाचं काय म्हणणं आहे. १) या प्रश्नांचं काय? #लॉकडाउन नियमानुसार लग्नसोहळ्यासाठी फक्त २ तासाचा अवधी आणि २५ जणांच्या उपस्थितीची अट आहे. पण नवरीलाच तयार होण्यासाठी तासभर लागतो, मग २ तासात लग्न कसं उरकणार? जेवण कधी करणार? असे प्रश्न विवाह इच्छुकांना पडले आहेत. त्यामुळे 'लग्न पहावं २ तासात करुन' वाक्य प्रचलित होणार! #म #मराठी pic.twitter.com/RnpuPdQIuj — Suraj Borawake (@s_borawake) April 21, 2021 २) भावनांचा खेळ लग्न समारंभ हा २५ माणसांना घेऊन फक्त २ तासात उरकायचा आहे. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का??? २५ जणांपर्यंत ठीक होतं पण दोन तासात कसं शक्य आहे???? भावनांचा खेळ मांडला का???? — Adv. Bhakti Jogal (@BhaktiJogal) April 21, 2021 ३) शक्य आहे का हे खरंच साहेब हे शक्य आहे का.???? २ तासात लग्न..?pic.twitter.com/6USJDF7RUy — Tushar Chaudhari (@tchaudhari293) April 21, 2021 ४) ही पण वसुलीच. लग्न समारंभ साठी फक्त 2 तास? आणि निर्बंध मोडल्यावर 50000 दंड म्हणजे तुम्ही ठरवून ये नियम आणले की वसूली करायचीच आहे. 100cr ची वसूली थांबली काय? वसई विरार मध्ये दूध भाजी पाला चे दुकान सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत उघडणार फक्त हे काय लॉजिक? — Nilesh Dubey(@nilesh_dubey) April 21, 2021 ५) असा नियम बनवा ना. लग्न झाल नाही तर पैसे परत कराव च लागणार, असा काही नियम नाही की लग्नाच्या हॉलयांनी लग्न झाल नाही तरी पैसे घ्यावा म्हणून — पव्या (@win98761) April 21, 2021 ६) पुढेच ढकला लग्नासाठी जमलेल्या 25 जणांपैकी एकही पॉझिटीव्ह नसेल कशावरुन? आणि तो पुढे किती जणांना बाधीत करेल याचा अंदाज कसा काढणार? यापेक्षा सर्व लग्न पुढे ढकलणे जास्त सोयीस्कर नाही का? — Amit Oswal (@omcellulars) April 21, 2021 ७) कपडे कोण आणुन देणार? लग्न समारंभ चालू ठेवले..मग. वर-वधु चे कापडं कोण आणुन देणार का ???? @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #COVIDEmergency2021 #maharashtralockdown — Krishna Bhavale (@BhavaleKrishna) April 21, 2021 ८) त्यापेक्षा ऑनलाइन करा. खर तर लग्न ऑनलाईन पाहिजे — Dnyaneshwar Nande (@Dnyanes76077438) April 21, 2021 ९) अशी काहीतरी शिक्षा करा लग्ना के नियम मोडणाऱ्या ला 5 वर्ष मैरेज सर्टिफिकेट नाही देण्यात यावे व त्यांचे आधार मध्ये नाम बदली न करण्यात यावे एसे कही तरी शिक्षा करा कारण 10000 ते 50000 दंड करूँन काही ही फरक पडणार नाही, लग्न करणारे 50000 सहज DJ उडवू शकतात तर दंड देऊन 100 लोकना बोलवून 6 तास लग्न करेन. — Bharat Gudhka (@bhgudhka) April 22, 2021 १०) दोन महिने नाही केलं लग्न तर. लवकर ब्रेक the chain साठी पूर्ण@#कडकlockdown शिवाय दुसरा मार्ग नाही . थोडा थोड lockdown krun पेशंट व कोरोना दोन्हीही वाढत आहे. लोक शट्टर बंद व मागून दुकान सुरू. 2 महिने लग्न नाही झाली तर काय fraka पडणार आहे. — Dr.SAM (@SWATI_MANE_) April 21, 2021 ११) असे सर्वसामान्यांसाठी नियम बनवा लग्नकार्य समारंभासाठी जर लग्नाच्या हॉल नी आगाऊ पैसे घेतले असतील तर ते १००% परत करण्यात यावेत असे नियम पण काढावे.. सामान्य जनतेला दिलासा द्या.. — virendra (@viramit) April 21, 2021 १२) ही लग्न किती टीकणार? २ तासात झालेली लग्न किती काळ टिकतील हा एक प्रश्न आहे — मध (@honey09010) April 21, 2021 १३) दोन तासात काय करायचं? मुख्यमंत्री @OfficeofUTसाहेब २तासात कोणतेही लग्न कसे होईल. यापेक्षा थेट परवानगी नाकारायची ना. २तासात मंगलाष्टके म्हणायचे, कन्यादान करावे, सप्तपदी करावी की जेवण करावे. यातील कोणतेही कार्य थड होणार नाही. उशीर केला तर ५००००चा दंड ही लावणार. उपस्थितीची मर्यादा ठिक पण २तास अपुरेत#म pic.twitter.com/DWeghod9a7 — Brijmohan Patil (@brizpatil) April 21, 2021 १४) कितीदा नियम बदलणार? साहेब 2 तासात कोणी लग्न केले होते का.. किती वेळा निर्बंध बदली करणार.?जेवढा वेळ निबंध लादण्या साठी विचार करत बसला आहात तेवढ्या वेळ जर वाकससीन चा पुरवठा व तो कसा वाढवता येईल यावर लक्ष दिले असते तर महाराष्ट्र चे कल्याण झाले असते. — Yogesh Utekar (@Yogesh_Utekar11) April 21, 2021 १५) तुम्ही तुमच्या पोराचं लग्न लावून दाखवा २ तासात तूम्ही तूमच्या पोराच तरी लग्न लावू दाखवा या निर्णया मुळे तूम्ही घरो घरी भांडण लावल आहे माझ्या घरात पण कळत नाही काय करायच २ तासात जर माझ्या घरात कोणाला काही झाल तर तूम्ही जबाबदार असाल लक्षात ठेवा — Swapnil (@Swapnil92167362) April 21, 2021 १६) दोन तास तर. 'नवरी मुलीला स्टेज वर घेऊन या' एवढचं म्हणण्यात तासभर घालवणारा भटजी दोन तासात लग्न उरकावे लागणार म्हणून खुश झाला असेल. — Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) April 21, 2021 एकंदरितच लग्न समारंभाला २५ जणांची उपस्थिती हा मुद्दा योग्य वाटत असला तरी अनेकांनी दोन तासात लग्न ही अट जाचक असून ते प्रत्यक्षात अंमलात आणणं कठीण जाईल असं मत नोंदवल्याचं चित्र दिसत आहे.