महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचं प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडिवर फार अॅक्टिव्ह असतात. अनेकदा सामान्यांच्या मेसेजनाही रिट्विट करताना ते दिसतात. सोमवारी आनंद महिंद्रा यांनी ज्येष्ठ गीतकार गुलझार यांच्या कवितेच्या ओळी असल्याचं सांगत एक ट्विट केलं. परंतु नेटकऱ्यांनी या ट्विटमधील महिंद्रा यांची चूक पकडली. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये हाती सतत मोबाईल घेणाऱ्यांबाबत वक्तव्य केलं होतं. थॅक्यू गुलझारजी. ज्यांनी मला आपल्या फोनला चिकटून राहण्यासाठी आवश्यक असलेलं लॉजिक दिलं. परंतु मोबाईल आपल्याला दुसऱ्याशी कनेक्ट राहण्यासाठीही मदत करतो हे एक सत्य आहे, अशा आशयाचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये संगीतकार गुलझार यांच्या फोटोसोबत एका कवितेच्याही काही ओळी लिहिण्यात आल्या आहेत. ‘खुद से ज़्यादा संभाल कर रखता हूं मोबाइल अपना, क्योंकि रिश्ते सारे अब इसी में कैद हैं,' असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. Thank you Gulzarji, for giving me the logic for remaining wedded to my device! (Even if this was a tongue-in-cheek comment, it’s true that mobiles help us stay connected!) pic.twitter.com/P3NTrQ0Z16 — anand mahindra (@anandmahindra) December 9, 2019 Are you sure that these lines are from Gulzar saab?? Seems has his name on credits only. — Vjdorby (@Aazaad_Hind1857) December 9, 2019 Truth.!!! and it shouldn't be.. — Deep Dev (@ideepdev) December 9, 2019 This one is already listed in #NotByGulzar database #NBG @ThePuccaCritic pic.twitter.com/XE4IluUCeY — Pavan Jha (@p1j) December 9, 2019 Yes, It should only "HELP", BUT its shouldn't be the ONLY way to stay connected.. मुलाकाते जरुरी है, खुद को और रिश्तो को जिंदा रखने के लीये. । — The रायचंद (@v_ashutosh) December 9, 2019 Gulzar may not have written these lines. #WhatsappUniversity — Prithvi (@The_BeardMan_) December 9, 2019 बिलकुल ठीक कहा है गुलज़ार साहब ने, क्योंकि आजकल लोग मिलकर बात नहीं करते हैं, दूर दूर से ही mobile पर chat करते हैं। — SAMRITA महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर काही युझर्सना ते ट्विट आवडलं तर काही नेटकऱ्यांनी त्यात चूक शोधत ती गुलझार यांची कविताच नसल्याचं म्हटलं आहे. गुलझार यांच्या नावे सोशल मीडियावर ही कविता व्हायरल होत असल्याचं काही जणांची म्हणणं आहे.