देशभरात सध्या क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या विवाह सोहळ्याबद्दल प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. अखेर सोमवारी रात्री या बहुचर्चित विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ‘विरानुष्का’च्या विवाह सोहळ्याचा प्रत्येक तपशील सामान्यांना थक्क करत गेला. विराट आणि अनुष्काची जोडी या फोटोंमध्ये अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती. यावेळी दोघांनी केलेला पेहराव आणि ज्या रिसॉर्टमध्ये हा सोहळा पार पडला तेथील डोळे दिपवणारी सजावट असा एकूणच थाट पाहून सामान्यांचे डोळे नक्कीच आश्चर्याने विस्फारले असतील. मात्र, या सगळ्याचं कौतुक सरत नाही तोच आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

विराट-अनुष्काप्रमाणे आकाश हा प्रसारमाध्यमांच्या दुनियेत फारसा लोकप्रिय नाही. त्यामुळे आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा होण्याचे फारसे कारण नाही. मात्र, आकाश अंबानी याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनाही या लग्नसोहळ्याची दखल घेणे भाग पडले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही भारतातील सर्वात महागडी लग्नपत्रिका ठरण्याची शक्यता आहे. तब्बल दीड लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या या लग्नपत्रिकेच्या किंमतीत एखादी व्यक्ती आयफोन X विकत घेऊ शकते. ही लग्नपत्रिका चक्क सोन्याची आहे. त्यावर अत्यंत सुंदर आणि नाजूक सजावट आहे. एकूणच अंबानींच्या प्रतिष्ठेला शोभेल असा या लग्नपत्रिकेचा थाट आहे. आता लग्नपत्रिकाच इतकी महाग असेल तर प्रत्यक्ष विवाह सोहळा कसा असेल, याचा अंदाज आता अनेकांनी बांधायला सुरूवात केली आहे.

विराट-अनुष्काच्या लग्नात देण्यात आली ‘या’ चवीष्ट पदार्थांची मेजवानी