न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी देशवासियांना आनंदवार्ता दिली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर ३७ वर्षीय पंतप्रधान आर्डेन सहा महिन्यांसाठी रजेवर असतील. जसिंडा यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना त्यांनी मुलीला जन्म दिला होता.

‘मी सहा आठवड्यासाठी सुट्टीवर जाणार आहे तरी देशाच्या सेवेसाठी मी सदैव असेन’ असंही त्या म्हणाल्या. जानेवारी महिन्यात त्यांनी गर्भवती असल्याची आनंदवार्ता देशवासियांना दिली होती. या आनंदवार्तेनंतर अनेकांनी जसिंडा यांना सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘मी देशाची सेवा करते. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या कामही करतात आणि मुलांचे उत्तम संगोपनही करतात. त्यामुळे माझ्यासाठी हे जरी मोठं आव्हान असलं तरी मी ते स्विकारलं आहे’ अशी प्रतिक्रीया त्यांनी पूर्वी दिली होती.

Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

२००८ साली जसिंडा या न्यूझीलंडच्या संसदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेक वादग्रस्त समस्यांवर जसिंडा यांनी काम केलं आहे. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, मानवी हक्क, पर्यावरण, शांतता, महिलांचे अधिकार, समलैगिंक विवाह यासारख्या अनेक विषयांवर जसिंडा यांनी मांडलेल्या भूमिका या अत्यंत प्रभावी होत्या. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रं स्विकारली. विशेष म्हणजे त्यांना २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तरुण आणि महिला मतदारांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. मोफत शिक्षण, गरिबीपासून मुक्तता, महिलांची स्थिती सुधारणं, परवडणारी घरं, किमान वेतनात वाढ, देशातील सर्व नद्या सर्वांना पोहता येईल इतक्या स्वच्छ बनवणं विषमतेशी लढा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती भत्त्यात वाढ, स्थलांतरितांच्या संख्येत कपात करणं हे त्यावेळी त्यांच्या प्रचाराचं प्रमुख वैशिष्ट्य होतं.

‘आम्हाला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे त्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद’ असं लिहित त्यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत.