पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदूंचे अस्तित्व नष्ट झाले आहे. मात्र येथील हिंदूंनी कधीही मुस्लिमांविरोधात बदल्याची भाषा केली नाही. त्यांनी निमूटपणे मृत्यूला कवटाळले. म्हणून इतर हिंदूंनी काश्मीर पंडितांकडून सेक्युलॅरिझम आणि सहिष्णुता शिकावी.. बॉलीवूडमधील प्रसिद्ध खलनायक प्रकाश राज यांची ही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली आहे. प्रकाश यांच्या चिथावणीखोर विधानाने अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

पण हे खरे नाही. ट्विटरवर प्रकाश राज यांच्या कथित विधानांवर हल्लाबोल करण्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून अफवा पसरवणाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला आहे. समाजमाध्यमांवर अशा अफवाबाजांवर विश्वास ठेवून माझ्यावर टीका करणाऱ्यांनी माझ्या विधानाची बारकाईने तपासणी करण्याचे आवाहन राज यांनी केले आहे. हिंदूंविषयीचे विधान कोणीतरी माझ्या तोंडी घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.