फक्त पैशांची श्रीमंती असून चालत नाही माणसाकडे मनाची श्रीमंती देखील असावी लागते. ‘एअरटेल’चे चेअरमन सुनील मित्तल यांनी ७ हजार कोटींची संपत्ती दान करून खऱ्या ‘श्रीमंती’चं दर्शन घडवलं आहे.

आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के भाग म्हणजे तब्बल ७ हजार कोटी रुपये सामाजिक कामांसाठी दान करणार असल्याची घोषणा त्यांनी गुरूवारी केली. ‘एअरटेल’ कंपनीतील आपले ३ टक्के शेअर्सही सामाजिक उपक्रमांच्या खर्चासाठी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘भारती फाऊंडेशन’च्या माध्यमातून ही सामाजसेवा दिली जाणार आहे, त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते महत्त्वाचे पाऊल उचणार आहेत. सामाजातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली. २०२१ साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मानस मित्तल यांनी बोलून दाखवला. या विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांवर जास्त भर दिला जाणार आहे, १० हजार विद्यार्थ्यांना यातून शिक्षण घेता यावं असा प्रयत्न त्यांचा असणार आहे.

भारतातील ‘हे’ अब्जाधीश दाम्पत्य आपली संपत्ती दान करणार

काही दिवसांपूर्वी ‘इन्फोसिस’चे सह संस्थापक नंदन नीलकेणी आणि त्यांची पत्नी रोहिणी यांनीदेखील आपली संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.