महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाच्या कर्णधारपदाची सूत्र हाती आली. यानंतर विराटने आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर भारतीय संघाचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम ठेवला आहे. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळतो आहे, मात्र विराट कोहलीला आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.

अवश्य वाचा – PHOTO GALLERY : भूतानमध्ये निसर्गाच्या सानिध्यात विराट साजरा करतोय वाढदिवस

विराट आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत सध्या भूतानमध्ये आहे. या महत्वाच्या दिवशी विराटने एका पत्रामधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विराट कोहलीचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे.

बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावरचा सामना दिवस-रात्र खेळणार आहे. त्यामुळे सुट्टीनंतर पुनरागमन करणाऱ्या विराटपुढे एक मोठं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – Happy Birthday Virat : जाणून घ्या विराटच्या नावावर जमा असलेले अनोखे ३१ विक्रम