विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन ठरली. विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर, देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच, उद्योगपती महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनीही टीम इंडियाच्या पराभवानंतर आपल्या भावना एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केल्या आहेत.

आनंद महिंद्रांनी पोस्ट करत लिहिले की, “टीम इंडिया प्रत्येक प्रकारे अप्रतिम खेळत होती आणि ज्यांच्या टीम इंडिया कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांच्या खूप पुढे आपली भारतीय क्रिकेट टीम पोहोचली. आपल्याला आता आधी पेक्षाही जास्त आपल्या भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्याची गरज आहे.” आनंद महिंद्रा हे या वर्ल्डकपमध्ये सुरुवातीपासूनच टीम इंडियाचा उत्साह वाढवत आहेत.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
Sunil Gavaskar Big Statement on Team India Test Series Defeat Against Australia Rohit Sharma IND vs AUS bdg 99
IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

ते पुढे बोलताना म्हणाले, “आयुष्यात माणसाने स्वतःचे नुकसान स्वीकारले पाहिजे आणि आयुष्यात पुढे जायचे असेल तर यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. म्हणून मी एक फोटो शेअर करत आहे जे मला आता कसे वाटते हे प्रामाणिकपणे बोलते.” असे ते पोस्ट करत म्हणाले.

(हे ही वाचा : ग्लेन मॅक्सवेलच्या ‘या’ कृतीवर हिटमॅन रोहित शर्माची बायको रितिका संतापली; रिअ‍ॅक्शन होतोय व्हायरल )

येथे पाहा फोटो

पोस्टवर लोकांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले, “खेळ खरोखरच आपल्याला नम्रता शिकवतो. टीम इंडियाचा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त अविश्वसनीय होता. त्यांना आता पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे आणि तुम्ही बरोबर सांगत आहात, नुकसान झाल्यास ते मान्य करुन पुढे सरसावले पाहिजे.”

आणखी एकाने शेअर केले, “आयुष्यात आणि क्रिकेटच्या खेळात, भावनांचा स्वीकार करणे हे ताकदीचे लक्षण आहे. टीम इंडियाने, अभिमान वाढवला आहे.”

तिसरा व्यक्ती म्हणाला, “एकदम सहमत! खेळ हा आपल्याला नम्रता शिकवण्याचा आणि एकत्र आणण्याचा अनोखा मार्ग आहे. चला टीम इंडियाला आपला अटळ पाठिंबा दर्शवूया, तर चौथा म्हणाला, आम्हाला टीम इंडियाचा अभिमान आहे.”

ही पोस्ट १९ नोव्हेंबरला शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरला १२,००० हून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत.

Story img Loader