scorecardresearch

Premium

Video : “स्त्रीचं सौंदर्य राखण्यासाठी गाढविणीच्या दुधापासून साबण…” मनेका गांधींचा व्हिडीओ व्हायरल

जाणून घ्या नेमकं मनेका गांधींनी काय म्हटलं आहे या व्हायरल व्हिडीओत?

Maneka Gandhi Video viral
जाणून घ्या काय म्हटलं आहे मनेका गांधी यांनी?

माजी केंद्रीय मंत्री आणि सुल्तानपूरच्या खासदार मनेका गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मनेका गांधी या गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या साबणाविषयी बोलत आहेत. यासाठी त्यांनी क्लिओपात्राचंही उदाहरण दिलं आहे.

काय म्हटलं आहे मनेका गांधी यांनी?

“गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या साबणामुळे स्त्रीचं सौंदर्य अबाधित राहतं. इतिहासातली एक प्रसिद्ध राणी होऊन गेली.. तिचं नाव होतं क्लिओपात्रा. क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधाने अंघोळ करत होती. दिल्लीत गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण ५०० रूपयांना विकला जातो. असं असतानाही आपण बकरीच्या दुधापासून किंवा गाढविणीच्या दुधापासून साबण का तयार करत नाही?” असा प्रश्न मनेका गांधी यांनी मंचावरून विचारला आहे.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

गाढवांची संख्या कमी होऊ लागली आहे

तसंच पुढे त्या म्हणाल्या की सध्या गाढवांची संख्या कमी झाली आहे. धोबीही कपडे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर करत नाहीत. लडाखमध्ये एक समुदाय आहे ज्यांनी हे निरीक्षण नोंदवलं की गाढवांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे त्यांनी गाढविणीच्या दुधापासून साबण तयार करण्यास सुरूवात केली. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेल्या साबणाने अंघोळ केल्यास स्त्रीचं शरीर कायम सुंदर राहतं. ती दीर्घकाळ सुंदर दिसते या आशयाचं वक्तव्य मनेका गांधी यांनी केलं आहे.

मनेका गांधी गाढविणीच्या दुधाचं महत्त्व सांगून त्यापासून साबणाची निर्मिती करण्याचं आवाहन करत आहेत. हा व्हीडिओ सुल्तानपूरच्या बल्दीराय आयोजित एका कार्यक्रमात आहे. सध्या झाडं गायब होताना दिसत आहे त्यामुळे लाकडं महाग झाली आहेत. गरीबाच्या घरात मृत्यू झाला तर लाकडांचाही बराच खर्च होतो. त्यापेक्षा शेणापासून गोवऱ्या थापा, त्या साठवा. गोवऱ्यांच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करा असाही सल्ला मनेका गांधी यांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-04-2023 at 16:23 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×