पाण्याला जीवन म्हटलं जातं. तसंच पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीतपणे पार पडत असते. त्यामुळेच पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराला अनेक पोषकघटकांचा पुरवठा होत असतो. म्हणूनच वेळच्या वेळी पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे शरिरासाठी धोकादायक ठरु शकतं, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तज्ज्ञांच्या मते, निरोगी शरीरासाठी दिवसातून दोन लिटर ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. जर आपण व्यायाम किंवा कठोर परिश्रम घेत असला तर पाच ते सहा लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तीन लीटरपेक्षा जास्त पाणी पिल्यास आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं, असं या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय. या व्हिडीओला आतापर्यंत ९५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

ओवर-हायड्रेशनमुळे होऊ शकतं ब्रेन फॉग

पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओवर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे जसे कमी पाणी पिणे धोकादायक असते, तसे अधिक प्रमाणात पाणी पिणेही धोकादायक असते. अति-हायड्रेशनमुळे ब्रेन फॉग, वजन वाढणं आणि डोकेदुखीचा धोका वाढू शकतो, असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.

न्यूट्रिशनिस्ट रेणू राखेजा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत हा दावा केला आहे. शरिरात अधिक प्रमाणात पाणी घेण्यात आले आणि जर ते बाहेर काढण्याचे तंत्र बंद असेल, तर शरिरात पाणी साठू शकते. साठलेले पाणी रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरिराला हानी होऊ शकते, असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे.

किडनीवर होऊ शकतो परिणाम

तसंच किडनी शरिरातील सर्व पाणी बाहेर टाकण्यास सक्षम नसते. त्यामुळे शरिरातील इलेक्ट्रोलाईटचा ताळमेळ बिघडू लागतो आणि अधिकचे पाणी शरिरात साठू लागते. परिणामी शरिराचे वजन वाढत जाते. आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याला वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग म्हटलं जातं. यादरम्यान रक्तात ऑक्सिजनची लेवल वाढते ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका ओढावू शकतो.

निरोगी शरिरासाठी दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. यात तुम्ही चहा, कॉफी आणि ज्यूस अशा गोष्टींचा समावेश करु शकता. शारीरिक काम करणाऱ्यांसाठी अधिक प्रमाणात द्रव शरिरात घ्यावे लागते. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिणे आदर्श मानलं जातं. व्यक्तीची उंची, वजन, व्यायामाची पद्धत यावरुन पाण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.