India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये सुरू झाला आहे. ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मैदानावर अनोखे दृश्य पाहायला मिळाले. थेट सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ही घटना सहाव्या षटकात घडली. तेव्हा काही लोक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू आले. काइल जेमिसनच्या षटकात शुभमन गिल फलंदाजी करत होता. यादरम्यान मुरली कार्तिक आणि त्याचे सहकारी समालोचक ऑफ-स्पिन चेंडूवर चर्चा करत होते. दरम्यान, काही लोकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण

( हे ही वाचा: IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद )

या घटनेशी संबंधित व्हिडीओमध्ये तुम्ही ३३ सेकंदावर जाऊन थेट ऐकू शकता. त्या वेळी काही लोक पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर आज भारताकडून कसोटी पदार्पण करत आहे.

( हे ही वाचा: बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद )

पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेर टीम इंडियाने एक गडी गमावून ८२ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ५२ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे तर चेतेश्वर पुजारा त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. हे ज्ञात आहे की दोन्ही संघांमध्ये एकूण ६० कसोटी सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने २१आणि न्यूझीलंडने १३ वेळा जिंकले आहेत.